निर्लज्ज बेटांची नगरी
Posted ऑक्टोबर 7, 2009
on:- आंत: Uncategorized
- टिपणी करा
मला गेल्या काही काळात राहून राहून एक प्रसंग आठवतोय. तो आहे गुंथर ग्रास यांचा. ग्रास हे जगप्रसिद्ध जर्मन लेखक. 1997 ला ते भारतात आले. कोलकात्त्याच्या झोपडपट्टीत राहिले. भारतावर काही पुस्तकही त्यांनी लिहिली. त्याच वर्षी देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. एवढा मोठा लेखक भारतात आहे आणि त्याला निमंत्रण नाही असं कसं होईल. वाजपेयींनी त्यांना 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवलं. पण ग्रास काही आले नाहीत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माध्यमांनीही विचारपूस केली. पण ग्रास काही बोलले नाहीत. शेवटी भारत सोडून जाताना ग्रास जे बोलले ते अस्वस्थ करणारं आहे. ते म्हणाले, भारतात दैन्य आणि दारिद्र्याचा महासागर आहे आणि त्याच महासागरात एका रात्रीला लाखो करोडो रूपये खर्च करणारे निर्लज्ज बेटही आहे. बेटांचा आणि महासागराचा संबंध क्षणोक्षणीचा, पण भारत हा असा एक अतर्क्य देश आहे. जिथे या दोन्हीचा कधीच संबंध येत नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा